" पसायदान डिजिटल नेवासा " या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, November 24, 2016

हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………।
मित्रांनो प्रयान्तांशी परमेश्वर हि जी म्हण आहे ती एकदम खरी आहे ,  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काही करायची धमक जर तुमच्यात असेल तर  तुमच्यासाठी आभाळ मोकळ आहे नुसत स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात , ती पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द , प्रामाणिकपणे केलेली मेहनत याच जोरावर आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो . कुण्या तरी कीर्तन काराने एका ठिकाणी म्हटले होते कि  देवकेचा मुलगा यशोदेकडे जाऊ शकतो तर या भारतात काहीही होऊ शकत . जगात  अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही . संगणकाच्या युगात वावरत असतांना लोकांना कॉम्पुटर हि गोष्ट खूप छोटी होऊन राहिली आहे पण ती कोणासाठी ज्यांना माहित आहे कि कॉम्पुटर हे माणसानेच बनवलेले आहे . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करतांना अडचणी , संकटे हि येणारच ,  फक्त त्या संकटांना हरवता आल पाहिजे . त्यांना हरवत असतांना तुम्हाला अपयश येईल पण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे . या येणाऱ्या अपयाशांपही बरेच जण हरले , यातच काहीनि  मिळालेल्या संधीला शेवटची समजून आत्महत्या हि  केली  मात्र काहींनी या संकटाना , आलेल्या अपयशांना हरवलं व अस काही करून दाखवलं कि जगात फारच कमी लोग ते करू शकतात . या आणि अश्याच लोकांची माहिती आपण या सदरात करणार आहोत या लोकांनी आभाळाला ठेंगण केल व दाखवून दिल कि प्रत्येक वादळ पेलू आम्ही आमच्यात  विश्वास आहे ,पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे , आम्ही  सयाद्री सारखे  ताट आहोत जाऊन सांगा वादळांना त्यांची आमच्याशी गाठ आहे . शेवटी म्हणतात हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है, माझ्या दृष्टीने बाजीकर ठरलेली हि काही लोकं , ज्यामुळे तुम्हाला नुसती  जगण्याचीच नाहीतर, जगत असताना काहीतरी करून दाखवण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल .